Mumbai Indian's new captain Hardik Pandya is eager to play again at his favorite ground

 मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पंड्या त्याच्या आवडत्या मैदानावर पुन्हा खेळण्यासाठी उत्सुक

मुंबई: "इंडियन प्रीमियर लीग"च्या नव्या पर्वासाठी मुंबई इंडियन्स सज्ज झाली आहे आणि तेही नवा कर्णधार हार्दिक पांड्या यांच्या नेतृत्वाखाली. ज्या फ्रँचायझीकडून कारकिर्दीला सुरुवात केली, त्यांच्यासाठी पुन्हा खेळण्यासाठी हार्दिक उत्सुक आहे.

हार्दिकने सोमवारी मुंबईत सीझनपूर्व पत्रकार परिषदेत सांगितले की, “सर्वप्रथम, मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परत येणे खूप चांगले आहे.  मी परत आलो आहे जिथून मी प्रवासाला सुरुवात केली. ही एक अतिशय वास्तविक भावना आहे, कारण २०१५ पासून आतापर्यंत मला जे काही मिळाले ते या संघामुळे आहे. २०१५ मध्ये जेव्हा मी पदार्पण केले तेव्हा माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. मी येथे पोहोचलो आणि पहिल्या दिवसापासून माझ्या आवडत्या मैदानावर पुन्हा खेळलो याबद्दल मी खूप आभारी आहे”.

मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर आतापर्यंतच्या तयारीवर समाधानी होते आणि इंट्रा स्क्वॉड सराव सामने कसे पूर्ण होतात हे पाहण्यास उत्सुक आहेत. “आम्ही सध्या चांगल्या लयमध्ये आहोत. आमच्याकडे मोठे पथक आहे. आम्ही आज आमचा पहिला सराव सामना खेळणार आहोत. काही युवा खेळाडूंना संघात स्थान मिळवण्यासाठी चांगली कामगिरी करताना मी पाहत आहे आणि ही एक चांगली स्पर्धा आहे,” असे बाऊचर म्हणाले.

हार्दिकने MI मधील त्याच्या पुनरागमनाला घरवापसी म्हटले आणि सांगितले की कारकिर्दीच्या सुरुवातीला एक दिवस मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळेल याची त्याने कधीही कल्पना केली नव्हती. “परत आल्याने खूप छान वाटते. १० वर्षांनी मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करेन असे कधीच वाटले नव्हते. ही भावना अप्रतिम आहे.  पुढील हंगामासाठी आणि माझ्या जुन्या सहकाऱ्यांसोबत पुन्हा खेळण्यासाठी खूप उत्सुक आहे.  आम्हाला एकत्र खूप यश मिळाले आहे,” असे पांड्या पुढे म्हणाला.

बाऊचरला वाटले की संघ चांगल्या स्थितीत आहे आणि नवीन खेळाडू विशेषतः रोमांचक आहेत.  “आम्हाला नवीन आंतरराष्ट्रीय खेळाडू मिळाले आहेत.  ते खूप उत्साही आहेत, जे नेहमीच चांगले असते.  आमचा हंगाम खूप चांगला होता.  आम्ही याक्षणी खूप चांगल्या स्थितीत आहोत,” असे बाऊचर म्हणाले.

हार्दिकने  कर्णधारपदाचा मंत्र सांगितला तो म्हणजे,  ज्या गोष्टी नियंत्रित करता येतील त्यावर नियंत्रण राखण्याचे लक्ष्य केंद्रित करण्याचे. “तुम्ही प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.  मी उद्या आयपीएल जिंकू शकत नाही. हे फक्त काही महिन्यांतच होऊ शकते.  त्या दोन महिन्यांत आपण कशावर लक्ष केंद्रित करू शकतो, आपण तयारी कशी करतो, आपण एकमेकांची काळजी कशी घेतो, आपण एकमेकांना ओळखतो याची खात्री कशी करतो, हे महत्त्वाचे आहे. आम्ही फक्त एकच वचन देऊ शकतो की, आम्ही क्रिकेटचा एक ब्रँड खेळू ज्याचा सर्वांना आनंद मिळेल,” असे हार्दिकने आश्वासन दिले.

बाऊचर यांनी कर्णधार म्हणून हार्दिकने नवीन कल्पना आणल्याचा संकेत दिले आणि सांगितले की, हार्दिकला संघातून सर्वोत्तम कामगिरी करून घेता यावी ही त्याची भूमिका आहे. “मी त्याला शक्य तितकी मदत करण्याचा आणि प्रत्येकाला योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न करेन.  मी कर्णधाराला शक्य तितके सपोर्ट करणार आहे,” असे ते पुढे म्हणाले.

आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि या मोसमात अष्टपैलू म्हणून खेळणार असल्याचे  हार्दिकने शेवटी सांगितले, “मला माझ्या शरीरात कोणतीही समस्या नाही. शक्य ते सर्व सामने खेळण्याची माझी योजना आहे,” असे तो म्हणाला.

'मुंबई इंडियन्स' रविवारी २४ मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध त्यांच्या आयपीएल २०२४ मोहिमेला सुरुवात केली.

The tickets for MI home games are now live, click here for more details: https://in.bookmyshow.com/sports/mumbai-indians-vs-rajasthan-royals/ET00388586

Shop for official MI Merch: https://shop.mumbaiindians.com/

 

Comments